मनोज जरांगे यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत तालुक्यातील सकल मराठा समाजाने दि.२४ रोजी पुकारलेल्या रास्तारोको आंदोलनास नांदगांव येथे चांगला प्रतिसाद मिळाला येथील हुतात्मा चौकात तब्बल दोन तास करण्यात आलेल्या आंदोलन प्रसंगी शासनाच्या विरोधात जोरदार घोषनाबाजी करत तप्त उन्हात शेकडो आंदोलक रस्त्यावर बसून होते. या प्रसंगी नांदगांव ४० गांव, छ.संभाजी नगर, येवला, मनमाड, मालेगांव या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
या आंदोलनाची नांदगांव पो नि प्रितंम चौधरी यांना पूर्व कल्पना असल्याने शहरातुन जानारी वाहतूक अहिंसा चौकापासुन रोकण्यात आली होती. आंदोलन संपल्यानंतर दोन तास १० मिनिटाने रहदारी सुरळीत झाली. दरम्यान रस्तारोको मध्ये पाणी टँकर, तेलटँकर, बस, शेतीमाल वाहतुक करणारी वाहने स्कुलबस आदी वाहने आडकली होती, रस्त्यावर सुमारे एक कि.मी अंतरावर वाहनांची रांग लागली होती, दुचाकी वाहतूक आंदोलन दरम्यान सुरळीत होती.
आंदोलकानी सगे-सोयरे यांचा आरक्षणात समावेश करण्यात यावा त्याप्रमाणे ओबीसीतुन आरक्षण मिळावे हि मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. आंदोलनात सकल मराठा समाजाचे उपोषनकर्ते विशाल वडगुले, राजु देशमुख माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, जि.प सदस्य रमेश बोरसे, माजी सभापती विलास आहेर, निलेश चव्हाण, महेंद्र बोरसे, तात्या बोरसे, खालकर दादा, लोखंडे दादा, नगरसेवक नंरेंद्र काकळीज, रमेश काकळीज, सह शेकडो मराठा समाज कार्यकत्यांनी रास्तारोको आंदोलनात भाग घेतला होता.
या दरम्यान एक आंदोलकाने फेकुन दिलेल्या अस्ताविस्त पडलेल्या पाण्याच्या बाटल्या जमा करुन एक गोणीत भरुन आंदोलनातील स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. दरम्यान पो. नि. प्रितम चौधरी आणि पो. उ. नि. मनोज वाघमारे यांनी हुतात्मा चौक व अहिंसा चौक येथे चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणातीच गैरसोय झाली नाही.
0 Comments