भाजप लोकसभा उमेदवार भारतीताई पवार यांना तालुक्यातुन मताधिक्य देण्यासाठी बैठकांचा धडाका

 Bay team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव नाशिक 

माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री व लोकसभेच्या उमेदवार श्रीमती भारतीताई पवार यांना सर्वाधिक मते आपल्या मतदारसंघातून मिळवून द्यायची असल्याचा निर्धार करून नांदगाव तालुक्याचे आ. सुहास अण्णा कांदे यांच्या वतीने मतदार संघातील प्रत्येक जिल्हा परिषद गटांमध्ये  कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे नियोजन केले आहे. याप्रमाणे मंगळवारी सायंकाळी साकोरा या जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे हे होते.
कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करतांना आ. सुहास अण्णा कांदे 

या मेळाव्यास गटातीलबूथ प्रमुख शक्तीयुत प्रमुख सरपंच सदस्य चेअरमन डायरेक्टर तसेच शाखाप्रमुख, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय पक्षातील पदाधिकारी  हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन करताना म्हटले की, लोकसभेच्या 
उमेदवार डॉ. भारती ताईंकडे ९ विधानसभा मतदार संघाचा कारभार आणि त्यातच केंद्राचे मंत्रिपद आल्याने त्यांचे कार्यक्षेत्र अवघे राज्य आहे. त्यामुळे त्यांना प्रत्येकाला भेटण्यासाठी वेळ मिळाला नसेल, पण आम्ही तुम्हाला ताईंची कमतरता भासू दिली नाही. तुमच्या प्रत्येक सुखदुःखात सतत सोबत होतो आणि आहे, आणि यापुढेही राहु अशी ग्वाही देत देशहितासाठी देशाच्या उन्नतीसाठी म्हणून भारती ताईंना सर्वाधिक मते आपल्या मतदार संघातून मिळवून द्यायचे आहे व मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे असा निर्धार केला. 
उगाच नकारात्मक बोलू नका, सुहास आण्णा ला मतदान करायचे आहे असे समजून काम करा असे ही मार्गदर्शन यावेळी केले. 

मंत्री भुजबळांना उद्देशून पुन्हा डागली तोफ 

महायुतीच्या डॉ. भारती ताई पवार यांच्या विजयाचे श्रेय शिवसेना घेईल म्हणून मित्र पक्ष असलेला राष्ट्रवादी (अजित पवार गट) राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) तुतारी चे काम करत आहे. ही गोष्ट मी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर घालणार आहे. विश्वासघात करायचा असेल तर मंत्रीपदाचा राजीनामा द्या.. मंत्री छगन भुजबळ यांना उद्देशून उदगार काढले.

मेळाव्यास उपस्थित शिवसेना आणि मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते 

याप्रसंगी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, माजी सभापती विलासराव आहेर, सौ. अंजुम ताई कांदे, विष्णु निकम सर, भाजप तालुकाध्यक्ष गणेश शिंदे, राजेंद्र पवार,अंकुश कातकडे, संजय आहेर, रमेश पगार, महिला आघाडी च्या सौ. उज्वला ताई खाडे, सौ.श्रद्धा कुलकर्णी, ॲड.विद्या कसबे, अण्णासाहेब पगार, अनंत इनामदार, सभापती अर्जुन निकम, उपसभापती दीपक मोरे, रमेश बोरसे, तेज कवडे, संजय सानप, भिका दराडे, अरुण भोसले, दिगंबर भागवत, सतीश बोरसे, सागर फाटे, राजाभाऊ जगताप, पोपट सानप, अँड. राजेंद्र दराडे, मधुकर सुरसे, मधुकर गिते, अण्णासाहेब पगार, भगवान शेठ, उमेशकुमार सरोदे उपस्थित होते.


तुतारी चे बटन दाबून स्वतःची तुतारी वाजवून घेवु नका - कवडे 

या वेळी अध्यक्षपदी असलेल्या बापूसाहेब कवडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की,निवडणूक देशाची आहे तिला स्थानिक प्रश्नांची जोड देऊन संबंध जोडणे योग्य नाही. कारण कार्यक्षेत्र मोठे असल्याने कामासाठी मर्यादा येतात. तुमच्या कामासाठी सुहास अण्णा इनामदारीने काम करत आहेत. त्यांच्यासाठी ताईंना मतदान करा. ताई खासदार झाल्या तरच मोदी साहेब पंतप्रधान होऊ शकतील. तुतारीचे बटन दाबून तुमची तुतारी वाजवून घेऊ नका. एक प्रचलित पद्धत आहे कि, प्रवाहाच्या विरोधात जाऊ नये, ते फायद्याचे ठरत नाही. अण्णांच्या शब्दावर विश्वास ठेवून भारती ताईंना भरघोस मतांनी निवडून देऊ. त्याच प्रमाणे तर विविध वक्त्यांनी आपल्या भाषणात आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून मतदारसंघात सर्वांगीण विकास कामे सुरू असून आतापर्यंत मागील एकाही विधानसभा सदस्यांच्या कार्यकालात झाला नसल्याचे सांगून आण्णा सांगतील तेच धोरण असा निश्चय केला. 

उपस्थित मान्यवरांपैकी शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या सौ.अंजुम ताई कांदे, विष्णू निकम, दिलीप इनामदार, राजेंद्र पवार, राजाभाऊ जगताप, संजय सानप,अण्णासाहेब पगार, अप्पासाहेब पगार, यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे यांनी केले, सूत्रसंचालन बाजार समितीचे संचालक अमोल नावंदर यांनी केले.  यावेळी मळगाव व हिंगणवाडी येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व अनेक तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा आमदार सुहास आण्णांनी भगवी शाल देऊन सत्कार केला. 

 

     

Post a Comment

0 Comments