मालेगांव आणि मनमाड रस्त्याच्या कडेला असलेल्या अतिक्रमण धारकांना नोटिसा

 Bay--team aavaj marathi 

  मारुती जगधने नांदगांव,


नांदगाव ते मालेगांव, आणि नांदगाव ते मनमाड रस्त्याच्या दुतर्फा व्यवसायिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर केलेल्या बे कायदेशीर अतिक्रमणे करुन रहदारीला व फुटपाथवर केलेली अतिक्रमणामुळे दिवसेंदिवस वाहतूकिची होणारी कोंडी लक्षात घेता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक यांनी रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून दुकान टाकलेल्या सर्व व्यवसायिकांना १६ फेब्रुवारी रोजी नोटीस बजावले आहे.


दरम्यान स्थानिक ग्रांमपंचायतीने रहदारीस व सार्वजनिक जल वाहीला अतिक्रमणामुळे अडथळे निर्माण होत आहे, तसेच रस्ता चौफुली वरुन रस्ता ओलांडताना वाहन चालकाला वळणावरील मार्ग दिसत नसल्याने होणारे अपघात आदी कारणास्तव झालेल्या तक्रारी आदी कारणास्तव सदर अतिक्रमणे काढण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरील निर्णयामुळे तालुक्यातील शेकडो व्यावसायिकांच्या डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार निर्माण झाली आहे.



या नोटीस मध्ये त्यांनी म्हटले आहे की, आपणास या नोटीस व्दारे कळविण्यात येते की राष्ट्रीय महामार्ग ७५३ लगत सा क्र. १०३/०००ते नं १४७,४२०,मध्ये रस्त्याच्या डाव्या ,उजव्या बाजूला आपण विना परवाना सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत राष्ट्रीय महामार्गाच्या जागेवर दुकान, टपरी,हाॅटेल इत्यादी थाटून कच्चे व पक्के  बांधकाम करुन अनाधिकृतरित्या अतिक्रमण केलेले आहे.ते राष्ट्रीय महामार्ग नियंञण कायदा (जमिन आणी वाहतूक)२००२ व मुंबई महामार्ग अधिनियम १९५५ पथकिणारी वर्ती समांतर रेषा नियमानुसार बेकायदेशीर कृत्य आहे.तरी आपणास नोटीसव्दारे सूचित करण्यात येते की नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसाचे आत सदरहुन घर, दुकान, टपरी, हाँटेल, रसवंती गृह इत्यादी त्वरीत हटवावे अन्यथा बांधकाम उपविभागामार्फत पोलीस खात्याच्या मदतीने सदर जागेवरील अतिक्रमणे कोणतीही पुर्व सुचना न देता काढण्यात यईल, तसेच त्यावर होणारा खर्च आपणा कडुन वसूल करण्यात येईल. 

त्याचप्रमाणे होणार्या नुकसाणीस आपण जबाबदार राहणार याची नोंद घ्यावी असे नोटीस व्दारे उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग २ नासिक यांनी कळविले आहे. सदर नोटीसची प्रत तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक नांदगाव यांना माहितीसाठी पाठविण्यात आलेल्या आहेत. वरील कार्यवाहीमुळे अशा शेकडो कुटुंबावर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होणार असून, शेकडो लहान मोठे व्यवसाय थाटून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत असलेल्या अशा व्यवसाईकांचा प्रश्न ऐरणीवर आला असून तालुक्यातील शेकडो व्यावसायिकाच्या कुटूंबियांच्या उदरनिर्वाहाचा यक्षप्रश्न उभा राहिला असून त्यांच्या डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments