येथून घाटमाथ्यावरील बारा गावांची कायमस्वरूपी भागू शकते तहान कायमस्वरूपी विहीर अधिग्रहण व नवीन योजनेचे वाचु शकता दरवर्षी कोट्यवधी रुपये

 Bay- team aavaj marathi 


ढेकू येथील विहिरीतून पाणी घेतांना महिला व नागरिक 

दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी होत चालले असून, नांदगाव तालुक्यात दरवर्षी इतर ठिकाणच्या तुलनेत पाऊस होत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्याचे आ सुहास अण्णा कांदे यांनी मनमाड शहरासाठी तब्बल ३७५ कोटींच्या निधीतून ही योजना १८ महिन्यात पूर्ण होणार आहे. मनमाड शहर गेल्या ५० वर्षांपासून पाणी टंचाईशी झुंजत आहे. पण, येथील पाणीप्रश्ना कडे कधीही गंभीरपणे लक्ष दिले गेले नाही. पण, आ. सुहास कांदे यांनी करंजवण पाणी पुरवठा योजनेचा पाठपुरावा करुन ती मंजूर करुन त्याचे कामही सुरु केले. या योजनेतून शहराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटला आहे.

गोंडेगाव येथे पाणी पुरवठा करणारा टॅंकर

त्याचप्रमाणे नांदगाव शहरासाठी माणिकपूंज व गिरणा धरणामधून नांदगाव शहरासाठी शाश्वत पर्याय म्हणून पाहिल्या जाणाऱ्या ४८ कोटी १२ लाख रुपयांच्या शहर समांतर नळपाणी पुरवठा योजने' ला सरकारने मान्यता दिली आहे. त्याचबरोबर आणखी इतर ५६ नांदगाव - मनमाड शहराच्या परिसरातील गावांची कायमस्वरूपी तहान भागविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन वेगवेगळ्या योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजना राबविल्या.अशा योजना हट्ट करून राबवून घेणे हे त्यांच्या अवतीभवती फिरणाऱ्या ज्या ट्रिपल इंजिन सरकारचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी सुहास अण्णा यांच्या लक्षात आणुन देवून कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची सोय करुन घेणे गरजेचे आहे.

*आज घडीला पाणी पुरवठा योजनेसाठी खर्च केलेले कोट्यवधी रुपये पाण्यातच गेले.*

मात्र वैयक्तिक स्वार्थापोटी पुर्व भागातील घाटमाथ्यावरील कुसूमतेल, ढेकू खु, व बुद्रुक, ढेकू तांडा, जातेगाव, वसंत नगर एक व दोन, चंदणपूरी, लोढरे, ठाकरवाडी, बोलठाण रोहिले, गोंडेगाव, जवळकी ह्या गावात दरवर्षी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वनवन विशेषतः महिला भगिनींना पाण्यासाठी होणारा त्रास लक्षात घेवून एक कर्तबगार हरहुन्नरी आमदार कांदे यांना वरील बारा गावांचा कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वैजापूर तालुक्यातील भादली गावच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मन्ह्याड डॅम या धरणातून मधल्या मार्गे भादली, तलवाडा ते कुसूमतेल च्या माथ्यावर अंदाजे पंधरा किलोमीटर मुख्य जलवाहिनी टाकून तेथे जलशुद्धीकरण केंद्र व जलकुंभ (पाण्याची टाकी) चे बांधकाम करुन तेथून वरील सर्व गावांना बाराही महिने स्वच्छ पाणीपुरवठा पाणी पुरवठा होवू शकतो. त्याचप्रमाणे वरील पैकी जवळपास सर्वच गावांना दरवर्षी पाण्याचे टँकर किंवा पाणी पुरवठ्यासाठी विहिरी अधिग्रहित करण्याचे काम पडणार नाही त्यामुळे शासनाचा दरवर्षी पाण्यासाठी खर्च होणारा महसूल वाचेल. व पाण्याचा प्रश्न सुटू शकतो.

परंतु प्रत्येक गावात जलजिवन मिशन, ग्रामीण पाणीपुरवठा योजना इत्यादी पाण्याच्या योजना वरील पैकी बहूतांश गावात मंजूर करून कुठलाही अनुभव नसतांना कोट्यवधी रुपयांच्या योजनांची स्वतःच्या पदरात पाडून ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांनी सुशिक्षित बेरोजगार अभियंता किंवा एखाद्या बांधकाम सोसायटीच्या नावावर घेऊन स्वताचा दोन पैसे फायदा कसा होईल यात धन्यता मानली. 

जातेगांव वसंत नगर येथील नवीन जलजिवन मिशन अंतर्गत खोदलेल्या विहिरींने गाठले तळ

परंतु कोट्यवधी रुपयांच्या जलजिवन मिशन अंतर्गत खोदलेल्या विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. त्यामुळे आज घडीला पाणी पुरवठा योजनेसाठी खर्च केलेले कोट्यवधी रुपये पाण्यातच गेले. वरील योजने बाबत सुमारे दहा वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व्हेक्षण करण्यासाठी नांदगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानूसार सर्व्हेक्षण करणार्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना या कमी खर्चात कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असतांना त्याची योग्य किंवा अयोग्य माहिती दिली की नाही दिली या बाबत मात्र काही समजले नाही.
तरी आ. सुहास अण्णा कांदे यांनी स्वतः लक्ष घालून वरील गावांचा इतर गावांप्रमाणे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत, आणि माता भगिनींच्या डोक्यावरील पाण्याच्या हंड्याचे ओझे उतरवून पुण्याचा वाटा घ्यावा.
 


Post a Comment

0 Comments