नांदगाव या तालुक्याच्या ठिकाणी स्मशानभूमीत सुविधांचा अभाव असल्याने कोणाचे निधन झाल्यानंतर अंत्यविधी च्या वेळी फक्त आणि फक्त चर्चा होते. परंतु पुन्हा एखाद्याच्या अंत्यसंस्कारा -साठी आल्यानंतर येथे काही बदल झाल्याचे दिसून येत नाही.
येथील स्मशानभूमीत लाईट नाही, अंत्यविधी साठी येणार्यांना पुरेशी आसन व्यवस्था नाही, पाण्याची सोय नाही, सायंकाळी अंत्यविधी असला तर येणार्या ससगे सोयरे व नातेवाईक स्मशानात अंधार असल्याने चाचपडत मोबाईलच्या बँटरीचा वापर करुन अंत्यविधीला उपस्थित रहावे लागते. अशीच घटना घडली एका ज्येष्ठ महिलेचा अंत्यविधी नातेवाईकाना स्मशानात अंधारात करण्याची वेळ आली. स्वच्छतेचा अभाव आहे, नियमित साफसफाई होत नसल्याने कचर्याचा ढिग साचल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे. हात पाय धुण्यासाठी पाणी तसेच सॅनिटायझरची सोय नाही. विद्युतदाहिनीची व्यवस्था नसल्याने पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी करावा लागतो, त्यासाठी विद्युतदाहिनी (electric crematorium) ची सुविधा पण नाही. पारंपरिक दाहसंस्कारासाठी आवश्यक लाकडाची उपलब्धता नगरपालिकेच्या वतीने नसल्याने मयताच्या नातेवाईकानी करावी लागते हॅण्डपंप आहे, नळाद्वारे पाणी पुरवठा नाही रात्रीच्या वेळी आवश्यक प्रकाश व्यवस्था नाही केली तर सोलर लाइट्सचा वापर शक्य आहे.वीज पुरवठा नसल्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था तर नाही. पर्यावरणपूरक व्यवस्था जेमतेम आहे.
स्मशानभूमित लाईट नाही पुरेशी असंन व्यवस्था नाही. सुविधांचा अभाव नांदगांव च्या स्मशानभूमत. दिसून आला नांदगांव च्या म्हसनवट्यात अंत्यविधीला आलेले झाले त्यामुळे स्मशानभूमीत संबंधित प्रशासनाने करण्याच्या व्यवस्थेत स्वच्छता आणि स्वच्छता व्यवस्थापन आणि कचऱ्याचे व्यवस्थापन.होत नाही.धार्मिक विधींसाठी आवश्यक साधनसामग्री नाही. धार्मिक विद्वान किंवा पुजार्यांची उपलब्धता नाही. मुख्य म्हणजे पार्किंगची पुरेशी व्यवस्था नाही. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्त्यांची देखभाल.नाही रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडांनी व्यापले आहे. अंत्यसंस्काराला जाताना अंधरात चाचपडत जाने आणी अंधारात चाचपडत येणे अशा वेळी ज्येष्ठाना ठोकरा खावा लगतात.
आपत्कालीन परिस्थितीसाठी त्वरित मदत सेवा नाही. याव्यतिरिक्त, स्थानिक गरजांनुसार आणि सांस्कृतिक परंपरांनुसार अतिरिक्त सुविधा पुरविणे देखील महत्त्वाचे आहे. पण तशी कोणतीच सुविधा येथील स्मशानात दिसून येत नाही. या संदर्भात अंत्यविधिला आलेल्या नागरिकात सुविधांचा अभाव असल्याने खंत व्यक्त होते. स्मशानात रोडवर लावण्यात आलेले पथदिप चोरांनी कापून नेले त्या संदर्भात पोलीसात गुन्हा नोंद नाही.अशी एक ना अनेक दुरावस्था आणि समस्येने मुख्यस्मशानाची झाली आहे. मयतासाठी आलेली पाहुने मंडळी माञ नांदगांवचे काय नाव घेऊन जात असेल."आना तो यही था… लेकिन आते -आते… देर कर दि … " असे स्लोगन स्मशान भुमीच्या भिंतीवर लिहून चालणार नाही. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी नगरपालिका प्रशासनाने करून एक दिवस प्रत्येकाला तेथेच जायचे आहे, फक्त आपल्या अधिकाराचा वापर करून वरील सुविधा उपलब्ध करून द्यावी ही नागरिकांच्या वतीने माफक अपेक्षा.
0 Comments