नांदगांव रेल्वेउड्डान पुलावर मारुती ओमनीला वाचवताना आयशर पलटी

 Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

दि २१, नांदगाव येथील बायपास रस्त्यावर असलेल्या रेल्वे उड्डाणपूलावर नॅशनल हायवे नं एन ७५३जे वर ताडपञी घेऊन जानारा आयशर टेंपो पल्टी झाल्याची घटना दि.१९ ऑगस्ट रोजी सकाळी घडली असून सुदैवाने जिवीतहानी झाली नाही.याउड्डानपुलाची निर्मिती झाल्या पासून सुमारे २५ वर्षात किमान ५० हुन अधिक लहान मोठे अपघात या ठिकाणी अवघड वळनावर झालेले आहेत. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगांव- चाळीसगाव नॅशनल हायवेवर विरूद्ध दिशेने येणाऱ्या ओमनीला वाचविण्याच्या प्रयत्नात गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने आयशर पल्टी झाला. या घटनेत जीवित हानी झाली नसुन वाहनांचे मोठे नुकसान झाले. वाहनाचा चालक व त्याचा सहकारी माञ बचावले. आयशर क्र. MH 23 AU 6141 हा आयशर अहमदाबाद हुन नांदगांव मार्गे लातुरला जात असतांना नांदगांव नजीक रेल्वे उड्डाण पुलावर विरूद्ध दिशेने येणाऱ्या ओमनी गाडीला वाचविण्याच्या प्रयत्नात रोडच्या बाजूला पल्टी झाला होता. दुपार नंतर क्रेनच्या मदतीने हि गाडी उभी करण्यात आली. दरम्यान आयशरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यातील सर्व सामान दुसऱ्या गाडीत भरून रवाना करण्यात आले. हा रस्ता नांदगांव शहरातुन गेलेला असून उड्डाणपूलासह ठिकठिकाणी धोकेदायक वळनावर रस्त्याच्या कडेला कुठेही फलक लावण्यात आलेले नाही, त्यामुळे बाहेर गावच्या वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज न आल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होण्याच्या घटना घडत आहेत.

अपघाती वळण व जोड रस्त्याच्या ठिकाणी वाहन चालक ,(धारकांची) रस्ता बदलताना तारांबळ उडते. त्यामुळे अपघात होतो आज पर्यंत उड्डानपुल निर्मिती पासून सुमारे २५ वर्षात किमान ५० हुन अधिक लहान मोठे अपघात या ठिकाणी अवघड वळनावर झालेले आहेत. नांदगांव रेल्वे उड्डान पुलाच्या तोंडावर तीन रस्ते (त्रिफुली)आहे. एक मार्ग साकोरा जातो दुसरा मार्ग ४० गांव जातो व तिसरा मार्ग नांदगांव कडे येतो.  याठिकाणी नेहमीच अपघात होत असतात असे असताना या ठिकाणी गतीरोधक असताना पुलावर चढणारे वाहन समोरच्या बाजूला चढ असल्याने वाहन वेगात असते व समोरून येणारे वाहन उतरत्या रस्त्याने असल्याने भरधाव वेगात असतात यादरम्यान तिसऱ्या रस्त्याने दुचाकी किंवा इतर वाहन आले तर वाहन चालकांचे लक्ष विचलित होऊन विचित्र अपघात होतो तरी या ठिकाणी आवश्यक ते फलक लावण्यात यावेत अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. 


Post a Comment

0 Comments