नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासनाने नांदगांव तालुक्यातील बँकेचे कर्ज थकलेल्या ९ शेतकर्यांना त्याची मालमत्ता जप्तीच्या अंतीम नोटिसा जिल्हा बँकेने बजावल्याने थकबाकीदार शेतकर्यांचे धाबे दणाणले आहे.
बँकेने मुदतवाढ दिल्यास शेतकर्यांना कर्ज फेड करण्यास तरतुद करता येऊ शकते .बँकेने अंतीम नोटिसा बजावल्या असल्याने शेतकरी वर्गात आता काय व कसे कर्ज भरावे या बाबत संपूर्ण कुटुंब संभ्रमात पडले आहे. आता जगावे की मरावे असा प्रश्न या कूटंबाना सतावत आहे. नांदगांव तालुका अवर्षणग्रस्त तालुका म्हणुन ओळख आहे सन २००९ मध्ये नांदगांव तालुक्यात महापूर आला होता त्यात अनेकांच्या जमिनी व घरे वाहून गेली याच काळात पिंपरखेड येथील एका शेतकरी महिलेने आत्महत्या केली होती. या काळात तालुक्यात जवळपास १६ शेतकर्यांनी कर्जबाजारी झाल्यामुळे व विष प्राशन करून व इतर मार्ग अवलंबून आपले जीवन संपविले होते. या तालुक्याने प्रचंड प्रमाणात आसमानी व सुलतानी संकटे सोसली आहे आता त्यातच काही वर्षापासून असलेला सततचा दुष्काळ गारपिट, नापिकी, अतिवृष्टीने शेतकरी मेटाकुटीला आला असताना शेतकर्यांवर बँकेने मालमत्ता जप्तीच्या नोटिसा बजावल्याने ९ कुटुंबीय प्रचंड दबावाखाली आले आहेत. दि ११ रोजी थकबाकीदारांच्या मिळकतीचा जाहीर लिलाव होणार आल्याचे जाहीर नोटीस मध्ये सांगितलें आहे.
तालुक्यातील थकीत शेतकरी बांधवांना मुद्दल व व्याज धरुन असलेली बँकेची थकीत रकमेसह नोटिसा बजावण्यात आल्या आहेत हे सर्व शेतकरी नांदगांव तालुक्यातील आहेत .१) सरस्वतीबाई लहिरे रा. भालुर कर्ज ८ लाख ७० हजार २) मुळडोंगरी येथील भिमा मोरे १४ लाख, ३)दगेसिंह राजपुत्र बोराळे ४२ लक्ष रुपये ४) भगिरथीबाई पाटील वडाळी ४५ लक्ष रुपये, ५)तात्याबा जाधव मनमाड ५ लाख ३१ हजार रुपये, ६)अशोक निकम वंजारवाडी ८लक्ष ९१ हजार रुपये, ७) दुर्याधन/ सुनंदा कदम रा.पांझन देव २८ लक्ष रुपये, ८) सुधीर मिसर. रा.माळेगांव ५ लक्ष रुपये, ९) रवींद्र मिसर ५ लक्ष रुपये या सर्व शेतकऱ्यांनी २०१४ ते सन १९ दरम्यान घेतलेले कर्ज थकित थकीत झाले आहे. त्यांना अंतीम मालमत्ता जप्तीच्या नोटीस व बजावण्यात आल्या आहेत. या नोटीस मुळे शेतकरी कुटुंब तणावाखाली आले आहे.बँकेने सर्व नियम अटी ची पूर्तता करुन या नोटिसा बजावल्या आहेत. शिवाय या कर्जदारांना त्यांच्या मालमत्ता संदर्भात सुचना देऊन नोटीस बजावल्या यात अनेक कर्जदारांनी काही प्रमाणात कर्जाचे हप्ते भरले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोमनाथ पाटील या शेतकर्याने बॅंके विरुध्द केली तक्रार
यात पाटील यांनी म्हटले आहे की, यांच्या आजी भागीरथीबाई गुलाब पाटील व चुलते भागवत बद्रीनाथ पाटील यांनी 2013 मध्ये फार्म हाऊस साठी 1500000 ₹ कर्ज घेतले होते. त्यासाठी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा नांदगाव यांना शेत जमिनीचे काही कागदपत्र ताराण दिले होते. परंतु सतत चे अस्मानी संकट, दुष्काळ, अतिवृष्टी आदी कारणास्तव सदर कर्ज परतफेड करता आले नाही. याबाबत बँकेने वेळोवेळी दिलेल्या नोटिसांवर सोमनाथ पाटील यांच्या कुटुंबातील त्यांच्या आजी व चुलते यांच्या जबरदस्तीने व धमकावून सह्या घेतल्या होत्या.असा आरोप निवेदनात केला आहे. तसेच 30 जुलै 2024 रोजी एका जिल्हा दैनिकात जाहिरात देवून सदर फार्म हाऊस साठी तारण दिलेल्या जमिनीचे लिलाव करण्याचे कट- कारस्थान रचून दि. 8/8/2024 रोजी जमिनीचा लिलाव करुन कर्ज वसुली करण्याचे ठरवले होते. परंतु याबाबत बँकेने पाटील यांच्या आजी व चुलते (कर्जदार) यांना जमीन लिलावाबाबत कुठलीही सूचना दिलेली नव्हती. त्यामुळे परस्पर लिलाव तारखेच्या दोन-चार दिवस अगोदर गावातील एका व्यक्तीने त्यांना पेपर मधील जाहिरात बाबत सांगितल्यानंतर सदर बाबतीत पाटील यांच्या कुटुंबाला माहिती मिळाली. त्यानंतर सोमनाथ पाटील यांनी दिनांक 7/8/ 2024 रोजी मुख्यमंत्री व संबंधित कार्यालयाकडे अर्जफाटे करुन जमीन लीलाव प्रक्रिया थांबवण्यात यावी म्हणून बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. तुर्तास दिनांक 8/8/ 2024 रोजी सकाळी उपोषणाच्या अगोदर 2,00000 लाख भरणा करुन जप्ती प्रक्रिया थांबवण्याबाबत बँकेला रीतसर अर्ज देऊन विनंती केली होती. तसेच बँकेनेही सदर जप्ती प्रक्रिया थांबवून 2 लाख रुपये स्वीकारले परंतु ते व्याजामध्ये वळवले तशी पावती बँकेने दिली होती. परंतु उर्वरित कर्ज आम्ही लगेचच 2 महिन्यातच भरतो. किंवा 30 सप्टेंबर 2024 पर्यंत भरतो. असे तोंडी किंवा लेखी जबाब दिले नव्हते. तरीही बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी धमक्या देऊन माझ्या कुटुंबातील माझ्यासह माझी आजी व चुलते यांच्या जबरदस्तीने काही कागदपत्रांवर तसेच मुख्यमंत्र्यांच्या नावे दिलेले अर्ज निकाली काढणे बाबत सह्या व अंगठ्याचे ठसे घेतल्यामुळे माझ्यासह माझे कुटुंबीय भयभीत झाले असून भीतीच्या वातावरणात वावरत आहे. असे पाटील यांचे म्हणणे आहे. यास्तव पुन्हा दि. 10/9/2024 ला निवेदनाद्वारे कळविलेले आहे. त्यात आम्ही फार्म हाऊस साठी घेतलेले 15,00000 लाख उत्पन्नाच्या स्रोतानुसार टप्प्याटप्प्याने भरण्यास तयार असून आम्ही दिनांक 8/8/2024 रोजी भरणा केलेली 2,00000 लाख रक्कम व्याजात न वळवता मुद्दल मध्ये वळवावी. तसेच बँकेने व्याजात संपूर्ण सूट द्यावी. व मुद्दल चे 15 लाख टप्प्याटप्प्याने उत्पन्नाच्या स्त्रोतानुसार भरण्यास मुभा द्यावी. असे सोमनाथ पाटील यांचे म्हणणे आहे. अन्यथा आम्हाला बेमुदत / प्राणांतिक उपोषण या सारखा मार्ग अवलंब करावा लागेल. तसेच सदर प्रकरणी बँक पदाधिकाऱ्यांच्या अशा प्रकारामुळे व धमकावन्यामुळे घरातील व्यक्तींनी डोक्यात टेन्शन घेऊन आत्महत्या केली तर त्यास सर्वस्वी शासन आणि संबंधित पदाधिकारीच जबाबदार राहतील असेही सोमनाथ पाटील यांनी शेवटी म्हटलेले आहे.
0 Comments