नांदगाव रेल्वे स्थानकावर चिमुकल्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश

 Bay -team aavaj marathi 

सिताराम पिंगळे सर पत्रकार मांडवड नांदगाव 

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना त्यांच्या जयंती निमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी 2 ऑक्टोबर हा दिवस "स्वच्छता दिवस" म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने म. वि. प्र. समाजाचे होरायझन अकॅडमी नांदगावच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढत "हम सबने अब ये ठाना हैं,भारत स्वच्छ बनाना है" स्वच्छतेचा संदेश दिला.

 यावेळी विद्यालय आणि नांदगाव रेल्वे स्थानक यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील शिक्षक,विद्यार्थी व रेल्वे कर्मचारी यांनी (दि.२७) रोजी नांदगाव रेल्वे स्थानकावर स्वच्छ्ता मोहीम पंधरवड्यास सुरुवात केली. या वेळी शहरातील रेल्वे कॉलोनी या ठिकाणी रॅली काढत स्वच्छ भारत सुदंर भारत, भारत माता की जय, जल ही जीवन हे, झाडे लावा झाडे जगवा, अश्या घोषणा देत, विद्यार्थ्यानी परिसर दुमदुमून टाकला होता.

या मध्ये रेल्वे कर्मचार्यांनी देखील सहभाग घेतला. रेल्वे च्या अधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत चिमुकल्यांना अल्पोपहार देऊन स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले तसेच विद्यार्थ्यांना रेल्वे स्थानकावर असलेले सर्व यंत्रणा व उपकरणाची माहिती दिली.

कार्यक्रमास मविप्र नांदगाव तालुका संचालक इंजि.अमीत  बोरसे यांनी शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम शाळेच्या प्राचार्या पुनम डी. मढे यांच्या मार्गदर्शनाखाली शरयू आहेर, सिताराम पिंगळे,अनुराधा खांडेकर,पृथ्वीराज वडघुले, आदी शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह डॉ. संदीप ढोके, हुकुम सिंग पाटील यांनी परिश्रम घेतले. 

यावेळी स्टेशन मॅनेजर नांदगाव, बी.के सिंग, विजयकुमार दुबे, डि.के. तिवारी, सर्वेश कुमार, एम. पी. सिंह, कैलास पाटील, पि.पी. पवार, एस.एस. महाजन, महाराष्ट्र पोलीस, जी.आर.पी, प्रवासी संघटना तालुका अध्यक्ष तुषार पांडे आदी सह. रेल्वे अधिकारी या स्वच्छता रॅलीमध्ये उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments