या गावात झाल्या दोन स्वतंत्र ग्रामसभा

 Team-- aavaj marathi 


नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे, बुधवार दि.३१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता ग्रामपालिकेच्या आवारात महिलांची ग्रामसभा घेण्यात आली, व पुरुषांची दि.१ फेब्रुवारी रोजी स्वतंत्र घेण्यात आल्या येथे प्रथमच महिला मोठ्या संख्येने ग्रामसभेसाठी उपस्थित होत्या. पहिल्यांदाच महिलांनी ग्रामसभेत सहभाग घेतल्यामुळे गावातील विविध समस्यांवर महिलांनी चर्चा केली,




याप्रसंगी महिलांनी गावातील अवैध दारू विक्री बंद करणे, येथील ग्रामपालीका मालकीची जुनी माध्यमिक शाळा असलेली व सध्या बखळ जागा श्री दत्त मंदिरासाठी देण्यात यावी, महिलांसाठी सार्वजनिक शौचालय बांधने, म.बस्वेश्वर चौकात पेव्हर ब्लॉक बसविणे, गावात ठिकठिकाणी झालेल्या सांडपाण्याच्या बंदिस्त गटारी करण्यात आलेल्या असून उर्वरित ठिकाणी बंदिस्त गटारी करण्यात याव्यात, या व इतर समस्या उपस्थित महिलांनी मांडल्या.

तसेच दि १ फेब्रुवारी रोजी स्वतंत्र पुरुषांच्या झालेल्या ग्रामसभेत येथील प्राथमिक शाळेजवळील व शिवकालीन पुरातन दगडी वेश, गाव तळ्याच्या जागेवरील व इतर सार्वजनिक ठिकाणचे अतिक्रमण काढणे, अवैध व्यवसाय बंद करणे, मांस मच्छी मार्केट गावच्या बाहेर स्वतंत्र करणे, भारत निर्माण योजनेंतर्गत खोदलेल्या विहीरीची खोली वाढवून तेथील पाणी पुरवठा योजनेच्या टाकीमध्ये टाकणे, गाव तळ्याच्या जागेवर सामाजिक सभागृह व सार्वजनिक स्वच्छता गृह करणे, जिल्हा परिषद सेस फंडातून ब्राह्मण गल्लीत पीव्हीसी पाईप टाकून करण्यात आलेली सांडपाण्याची गटारीचे पाईप काही दिवसांतच फुटल्याने त्याची भरपाई ठेकेदाराकडून वसूल करणे व निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारास विकास कामे देऊ नये, येथील आरोग्य उपकेंद्रात कर्मचारी व अधिकारी उपस्थित राहत नाही त्यांना नोटीस देणे, आ.ऊ. केंद्राची भिंत पाडणार्या ठेकेदाराकडून भरपाई करून घेणे, पालखी मार्ग सुशोभीकरण करुन पेव्हर ब्लॉक बसविणे, बौद्ध विहारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जागा देणे, गावाजवळ झालेल्या नवीन फ्लोटिंगची रिकामी जागा (ओपन स्पेस) ग्रामपंचायत नावावर करणे, बोरसे वस्ती येथे पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल करणे, त्याचप्रमाणे गावठाण जवळील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी गावातील डुकरांचा सुळसुळाट झाला असून बंदोबस्त करणे, दलीत वस्ती योजना राबविण्यात यावी इत्यादी विषयांवर सखोल व सकारात्मक चर्चा करून मान्यता देण्यात आली.

ग्रामसभेसाठी उपस्थित ग्रामपालिकेचे पदाधिकारी


याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी सतीश शिंदे यांनी पहिल्यांदा महिलांची स्वतंत्र ग्रामसभा घेऊन समस्या जाणून घेतल्या त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी त्यांनी केंद्र तसेच राज्य सरकार महिलांच्या बाबतीत राबवत असलेले महिलांचे ग्रामसभेतील अधिकार त्याचप्रमाणे गावच्या विकासासाठी सर्व महिलांनी एकत्रित येऊन दर तीन ते चार महिन्यातून एक वेळेला ग्रामसभा घेणेबाबत अर्ज देऊन आपल्या समस्या मांडाव्यात असे सांगितले.
याप्रसंगी चर्चेत सचितानंद भट, चंद्रभान झोडगे, भरत पाटील, रमेश पाटील, समाधान लाठे, अण्णा बागुल, समाधान कासार, सोमनाथ जाधव, बबन चव्हाण, जाबिर शेख, सोनु बोरसे, शिवाजी लाठे, अर्जुन वर्पे इत्यादी नागरिकांनी सहभाग घेतला.


ग्रामसभेचे दृश्य बघण्यासाठी खालील लिंक ला टच करा



 यावेळी सरपंच शांताबाई पवार, उपसरपंच पंढरीनाथ वर्पे, सदस्या सौ. कल्पना गायकवाड, सौ. शाबेराबानो शेख, सौ.कांताबाई खिरडकर, सौ.धनश्री पवार, सौ.अनिता निंबारे, सौ. वैशाली चव्हाण, सौ.मनिषा पगारे, सौ.ज्योती पगारे, आणि सौ. पुजा जाधव यांच्यासह रामदास पाटील, बाळासाहेब लाठे, संदिप पवार आणि सुरेश जाधव हे सदस्य आणि महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अशाच नाविन्यपूर्ण आणि आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन चे बटन दाबा आणि शेअर करण्यास विसरू नका.

Post a Comment

0 Comments