शिकण्याची कुठलीही वेळ नसते, प्रत्येक दिवस एक नवी संधी घेऊन उगवतो, फक्त आपल्याला संधीचे सोने करता आले पाहिजे. असे प्रतिपादन समाजसेविका सौ.अंजुमताई सुहास कांदे यांनी केले.
त्या शहरातील ओसवाल भुवन येथे सप्तरंगी सखी मंच च्या वतीने आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या.सौ. कांदे पुढे म्हणाल्या की, ज्या प्रमाणे तुम्ही महिलांनी या ठिकाणी मेळावा घेऊन विविध वस्तूंचे स्टॉल लावून खाद्यपदार्थासह, वेगवेगळ्या वस्तू विक्रीसाठी ठेवून छान संकल्पना राबवली ती निश्चितच कौतुकास्पद आहे.
आवड असली की, सवड मिळते. आणि हीच गोष्ट विचारात घेऊन आपले कुटुंबंप्रमुख आमदार सुहास अण्णा यांनी मतदार संघातील महिलांसाठी भव्य दिव्य उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली आहे. येत्या एक ते दीड महिन्यात गरजवंत, इच्छुक महिलांनी या मोफत प्रशिक्षण वर्गचा लाभ घ्यावा, तीस मिनिटापासून ते तीस दिवसांपर्यंत या प्रशिक्षणाचा कालावधी असणार आहे. पहिल्या टप्यात सुमारे वीस ते पंचवीस हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल.आपण सर्व मिळून तालुक्याचे नाव उज्वल करू असे सौ.अंजुमताई कांदे शेवटी म्हणाल्या.
यावेळी त्यांनी येथे लावलेल्या विविध स्टॉलला भेट देत अनेक वस्तूंची खरेदी करून महिला व बालकांचा हुरूप त्यांनी वाढवला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कंचन गुप्ता यांनी केले. याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी च्या सौ. उज्वला खाडे, सौ. रोहिणी मोरे, आरती शर्मा, रुपाली पारख, शुक्ला नाशिककर, प्रीती सेठी, नीलिमा नाशिककर, खुशबू अग्रवाल, भारती कळत्री, श्रुती अग्रवाल, श्वेता अग्रवाल, आदीसह शेकडो महिला, तरुणी,मुले उपस्थित होते.
0 Comments