तलाठ्याची शेतकरी बांधवांना अरेरावीची भाषा शेतकर्यांचे तहसीलदारांना निवेदन

 Bay team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव तालुक्यातील भालूर येथील तलाठी बालाजी घोडके यांचेकडे तीन ते चार गावांचा कारभार असुन त्यात भालूर, लोह शिंगवे, मोहेगाव, लक्ष्मी नगर, सर्व गावातील शेतकरी बांधव त्रस्त असून, हे तलाठी शेतकर्याना अरेरावीची भाषा वापरता. तसेच त्यांना संगणकीय प्रणालीचे ज्ञान नसल्याने वरील गावातील शेतकरी बांधवांच्या सात बारा उतार्यावरील अनेक नोंदी रखडल्या असून चौकशी केली असता ते उद्धट उत्तरे देतात त्यांच्या मुजोरीला लगाम लावावा असे खालील शेतकरी बांधवांनी तहसीलदार नांदगांव यांना दिलेल्या निवेदन म्हटले आहे.

तहसीलदार नांदगाव यांना निवेदन देताना शेतकरी बांधव

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भालुर येथील तलाठी बालाजी घोडके यांच्या मनमाणी कारभारात विरोधात शेतकर्यांनी कारवाईची मागणी नांदगांव तहसीलदार यांचेकडे केली आहे. शेतकरी बांधवांनी तक्रारीत म्हटले की तलाठी हे मनमाणी करतात. त्यांच्या कडील कामकाजात संगणकीय व तांञीक कामात त्यांना ज्ञान नसल्याने कामात आनेक उनिवा निर्माण होतात. त्यामुळे शेतकर्यांचे ७/१२ उतारे खोळंबले आहेत. उतार्या वरील विविध नोंदी रखडल्या आहेत. तसेच शेकर्यांना अरेरावीची भाषा करतात व शेतकर्याकडुन लाभाची मागणी करतात, असा आरोप निवेदनात केला आहे. तरी त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली असून निवेदनावर संतोश लहिरे, धनाजी जठाराग्नी, परसरांम शिंदे, बापू निकम, दत्तु कटके, दत्तु साबळे यांच्या सह्या आहेत.


चौकशी करून दुसरा तलाठी देण्याचे तहसीलदार नांदगाव यांचे आश्वासन 

यावेळी तहसीलदार नांदगाव यांनी शेतकरी बांधवांनी दिलेले निवेदन स्वीकारुन तलाठी बालाजी घोडके यांची चौकशी करून लवकरच दुसरें तलाठी दोन-चार दिवसात नियुक्त करून सर्व अडचणी दूर करण्याचा शब्द दिला़ आहे.

Post a Comment

0 Comments